सुशिक्षित लोकांनी केवळ राजकारणाच्या गप्पा मारण्यापेक्षा थेट राजकारणात येऊन बदल घडवला पाहिजे या राज ठाकरेंच्या विचाराला साद देत आपण या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीला प्रथमच सामोरे जाणाऱ्या पवार यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधताना पक्षाच्या ध्येयधोरणांसह अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

उमेदवारीमागचे कारण काय?
आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी विविध विषयांसह राजकारणावर चर्चा व्हायची, त्यावेळी लोकसंपर्क असलेल्या सुशिक्षित, जबाबदार लोकांनी राजकारणात आले पाहिजे, अशी इच्छा ते सतत व्यक्त करायचे. यात मलाही राजकारणात येण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. यापूर्वी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मी राजकीय जबाबदारी घेतली नव्हती. देशातील सध्याचे चित्र पाहता सर्वांनाच बदल हवा आहे. आपला लोकप्रतिनिधी सर्वसामान्य, सुशिक्षित व समस्यांची जाण असलेला असावा अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. राज यांचा सल्ला व सर्वसामान्यांची अपेक्षा पाहता मी या निवडणुकीतील उमेदवारीस होकार दिला.
यापूर्वी कोणतीही निवडणूक लढविलेली नसतानाही थेट लोकसभाच का निवडली?
यापूर्वीच्या इतर निवडणुकीतही पक्षाने उमेदवारीचा सल्ला दिला होता. मात्र, तत्कालिन कारणांमुळे मला ते शक्य नव्हते. या निवडणुकीसाठीही माझ्यासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला. सध्याच्या सरकारबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप आहे. महागाई, बेरोजगारी, असुरक्षितता या गोष्टी पाहता त्यांना आपल्यातला लोकप्रतिनिधी हवा आहे. यात केवळ लोकसभा किंवा विधानसभा हा विषय नाही.
निवडणुकीचा अजेंडा काय?
मतदारसंघाचा सर्वंकष व समतोल विकास झाला पाहिजे. त्यासाठी विविध वर्गानुसार काम करावे लागेल. नाशिकची गरज पाहता इथला रोजगार वाढविण्यासाठी गारमेंट व आयटी पार्क उभारण्यावर भर देऊ. त्याचबरोबर शेतमालासाठी ऑनलाइन मार्केट सिस्टीम उभारणे, द्राक्ष, कांदा, डाळींब संशोधन केंद्र, खुल्या जागांवर लोकोपयोगी प्रकल्प, मतदारसंघात छोटे बंधारे, सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा, महिलांसाठी स्री-सुरक्षा अभियान राबविण्यासह गुंडाना राजाश्रय न देणे माझा प्रमुख अजेंडा आहे. केवळ यावर न थांबता मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक दळणवळणाचे प्रश्नही हाती घेईल. निवडून आल्यावर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊन त्यांच्या संकल्पनेतील स्मार्टसिटीत नाशिकचा समावेश करुन घेणे माझी जबाबदारी असेल.
तुमची विकासाची संकल्पना काय?
निवडणुकीला सामोरे जाताना सर्वजण विकासावर भर देतात. मात्र, केवळ दळणवळणाच्या सुविधा झाल्या म्हणजे शंभर टक्के विकास होत नसतो. दळणवळण हा विकासाचा पाया आहे तो अधिक भक्कम केला पाहिजे. तसेच, आरोग्याच्या सुविधा वाढविणे, त्या वेळेवर पोहोचविणे, दरडोई उत्पन्नात वाढ, रोजगारनिर्मितीत विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य ज्यावेळी सुरक्षित, आनंदी व स्वच्छंदी जीवन जगतात त्यावेळी ते विकसित शहरात असल्याचे मानले जातात, त्याकडे माझा प्रयत्न असेल.
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न?
नाशिक मतदारसंघातील प्रश्नांबाबत बोलायचे तर शहरी व ग्रामीण असे प्रकारात वर्गीकरण करावे लागेल. ग्रामीण भागात मुलभूत प्रश्न आजही कायम आहेत. यात पिण्यासह शेतीसाठी पुरेसे पाणी नाही, उत्तम आरोग्यसुविधांचा अभाव, अपुरी वीज या प्रमुख समस्या आहेत. तर शहरी भागात बेरोजगारी मोठी समस्या आहे. ती कमी करण्यासाठी मोठा औद्योगिक प्रकल्प आणण्याची गरज आहे. ज्याच्या आधारे अनेक लघुउद्योग तयार होऊ शकतात व रोजगार वाढू शकतो. जिल्ह्यात स्वतंत्र एज्युकेशन हब होण्याची गरज आहे. तसेच सर्वसामान्यांना शहरात सुरक्षित वाटावे यासाठीही पोलिसांच्या सहकार्याने विविध प्रयोग हाती घेतले पाहिजे.
महापालिकेची सत्ता मिळूनही तुमच्या पक्षाने निराशा केली, त्याचे काय?
हा विरोधकांचा अपप्रचार आहे. मनसेला महापालिकेची सत्ता मिळाली तेव्हा मंदीचा काळ होता, तरीही जकातीचे खासगीकरण रद्द करून महापालिकेमार्फत जकात वसुली सुरू केली. यात महापालिकेच्या उत्पन्नात १७५ कोटींची वाढ केली. महसुल वाढत असतानाच जकात हटवून ‘एलबीटी’ लागू करण्यात आला. तसेच यापूर्वी केवळ रस्त्यांचे डांबरीकरण होत होते. मनसेने ४५० कोटी रुपयांच्या निधीतून नवे रस्ते तयार करण्याचे काम हाती घेतले. यात अंतर्गत रस्त्यांसह रिंगरोडचा समावेश आहे. स्वच्छतेसाठी हेल्पलाइन आहे, शहर ‘वाय-फाय’ करण्यासह ‘गोदापार्क’ला नवी झळाळी देण्याचे कामही मनसेतर्फे सुरू आहे. हे सर्व पहिल्या दोन वर्षात सुरू झाले आहे, अजून तीन वर्षांचा काळ बाकी असून, त्यात अनेक कामे होणार आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना काय आवाहन कराल?
आर्थिक प्रलोभनातून निवडणूक जिंकता येते, अशा भ्रमात असणाऱ्यांना यंदा धडा शिकवला पाहिजे. केवळ ४०-५० टक्के मतदान करून खासदार निवडून देण्यापेक्षा या राष्ट्रीय कर्तव्यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे. आपल्या सुखदुःखाशी समरस असणाऱ्यांनाच संधी द्या.
(शब्दांकन – विक्रम जोर्वेकर)
Sandip B says:
First look at your agenda during state and. Municipal corporation, try to acheive them and then make this promises, first make basic infrastructure in the city then make promises of smart city, where is the blue print u r party keeps talking about, don’t fool public, please reply.
Dr. Pradeepchandra Pawar says:
Dear Sandip ! Development of Roads and Water supply lines has started everywhere in Nashik. I hope you are aware of the recent developments in Nashik.
Mandar Uttam Dashputre says:
Saheb, mala manase cha active karyakarta vhayche ahe ; me kay kele pahije ??
Dr. Pradeepchandra Pawar says:
I have added you in Facebook and shared by Mobile number with you.